दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान
मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
वर्धा – ४५.९५ टक्के, अकोला – ४२.६९ टक्के, अमरावती – ४३.७६ टक्के, बुलढाणा – ४१.६६ टक्के, हिंगोली – ४०.५० टक्के, नांदेड – ४२.४२ टक्के, परभणी – ४४.४९ टक्के, यवतमाळ – वाशिम – ४२.५५ टक्के