Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

छ. संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

सर्वांनी शांतता राखावी असं उपमुख्यमंत्र्यांचं आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि. ३०: छत्रपती संभाजी नगरमध्ये रात्री दोन वाजता दोन गटात हाणामारी झाली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेकही झाली. दरम्यान, संभाजी नगरमधील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजीनगरातील तणाव आता कमी झाला आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजी नगरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच तणाव निर्माण होईल असे वागू नये. सर्वांना शांत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संभाजीनगरमध्ये रात्री घडलेली परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे, त्यामुळे मी सर्वांना शांतता राखण्याची विनंती करू इच्छितो. आज आपण प्रभू श्री राम यांची जयंती साजरी करत आहोत, त्यामुळे अशा वेळी सर्वांनी नियमांचे पालन करून शहरात शांतता राखली पाहिजे.” काही नेते या घटनेला राजकीय वळण देत आहेत. हे चुकीचं असून सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *