रावसाहेब दानवे म्हणतात, “मुंबईपासून नागपूरपर्यंत हाय स्पीड बुलेट ट्रेन सुरू करणार”
नाशिक : मुंबईपासून नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग तयार केला जात असून, त्याच्या बाजूनं हाय स्पीड बुलेट ट्रेन सुरू करणार असल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सांगितलं. त्यांच्या उपस्थितीत काल नाशिकमधे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रचार फेरी आयोजित केली होती. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
बुलेट ट्रेनसाठी जागादेखील तयार आहे, बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर तीन तासात प्रवास करता येईल. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं असून पुढच्या महिन्यात मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन संदर्भात दिल्लीत बैठक होणार आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली.
Source – AIR