मुंबईत एका दिवसात सापडले १४ रुग्ण, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ८९ वर तर एकूण ३ मृत
मुंबई: महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या ८९ वर पोहोचली असून फिलिपाईन्स या देशाचा नागरिक असलेला एक रुग्ण मरण पावला आहे. काल रुग्णांची संख्या ७४ होती जी गेल्या २४ तासात १५ ने वाढली आहे. यात मुंबईकरांसाठी थोडी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे कारण एकूण वाढीव १५ बाधितांपैकी मुंबईतले १४ रुग्ण असून १ पुण्याचा आहे.
काल भारतात जनता कर्फ्यु पाळण्यात आला. यावेळी संध्याकाळी ५ वाजता घंटानाद-थाळीनाद करण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी करण्यात आली होती. अद्यापही नागरिक या आजाराला गंभीरपणे घेत नाहीयेत हेच यावरून जाणवते. येत्या काळात बाधितांची व मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच राहावे व कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धोक्यापासून स्वतःचा व आपल्या परिवाराचा बचाव करावा.