सीबीएसई च्या १२ वी निकालानंतरच पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा युजीसीचा विद्यापीठांना सल्ला
नवी दिल्ली, दि. १४ : केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइ चा १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच उच्च शिक्षण संस्थांनी पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी असं विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने म्हटलं आहे. सर्व विद्यापीठांचे कुलगुरु, प्राचार्य आणि महाविद्यालयांच्या संचालकांना आयोगाने याबाबतचं पत्र पाठवलं आहे. काही विद्यापीठांनी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू केल्याचं निदर्शनास आल्यानंतर युजीसीनं हे पत्र पाठवलं आहे.