“कार्बन क्रेडीटसाठी पुढाकार घेवून सौरउर्जेकडे वाटचाल करावी लागेल” – राज्यमंत्री कपील पाटील
अहमदनगर: ग्लोबल वॉर्मींगचं संकट थोपवायचं असेल तर, कार्बन विसर्ग थांबविण्याशिवाय पर्याय नाही. याकरिता प्रत्येक गावाला कार्बन क्रेडीटसाठी पुढाकार घेवून सौरउर्जेकडे वाटचाल करावी लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील यांनी अहमदनगरमधल्या लोणी बुद्रुक येथे केलं.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाची संकल्पना विषद करुन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामपंचायतींना केलं.