जाणून घ्या युवा महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून मिळाले किती कोटींचे बक्षीस
१९ वर्षांखालच्या मुलींच्या या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा सात खेळाडू राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. इंग्लंडनं सतरा षटकं आणि एक चेंडूत सर्वबाद ६८ धावा केल्या. उत्तरादाखल भारतीय संघानं चौदा षटकांत, तीन खेळाडूंच्या बदल्यात हे आव्हान पार केलं. सौम्या तिवारीनं नाबाद २४, गोंगडी त्रिशा २४, तर कर्णधार शेफाली वर्मानं १५ धावा केल्या. या यशाबद्दल राष्ट्रपति, उपराष्ट्रपति आणि प्रधानमंत्र्यांनी या संघाचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडू देशातल्या युवकांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रेरणा ठरल्या आहेत, असं राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. तर, हे यश उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देईल, असं उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ यांनी म्हटलं आहे.
१९ वर्षांखालचा आयसीसी T२० विश्वचषक जिंकल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं असून त्यांचं यश अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रेरणा देईल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.