Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

धक्कादायक ! भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा पाकचा कट

धक्कादायक ! भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा पाकचा कट

जम्‍मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्‍या हल्‍ल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना काल शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्‍तानने भारताकडे सोपविले. यावेळी आपण विनाशर्त अभिनंदन यांना सोडल्‍याचे सांगत पाकने स्‍व:ताचीच पाठ थोपटवून घेतली आहे, तर दुसरीकडे सीमेवर गोळीबार सुरूच ठेवला. आता पाकिस्तान भारतीय लष्करातील जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट आखत आहेत. यामुळे भारतीय लष्‍कराकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

आएसआयचे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर एजंट आहेत. या एजंट्सचा वापर करुन आएसआयने भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा प्लॅन केला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांना जेवणात विष मिसळलं जाऊ शकतं म्हणून अलर्ट राहण्यास सांगिलं आहे. यासोबतच जेवणाचं सामान खरेदी करताना सावधगिरी बाळगण्यासही सांगण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असून भारताने कारवाई केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. त्यातूनच हे कट रचले जात आहेत. सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे गुप्तचर यंत्रणांनीही अलर्ट घोषित केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *