Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असल्याचे आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असल्याचे आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. ४: महाराष्ट्रात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकून, बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. सदस्यांनी मतविभाजनांची मागणी केल्यानंतर सदस्यांच्या शिरगणतीने मतमोजणी झाली. १६४ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं, तर ९९ सदस्यांनी विरोधात मतदान केलं. शिंदे गटात कालच सामिल झालेले हिंगोलीतल्या कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष  बांगर यांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं. समाजवादी पार्टीचे २ आणि एमआयएमचे एक आमदार तटस्थ राहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह २० सदस्य मतदानाच्या वेळी सभागृहात अनुपस्थित होते. त्यात काँग्रेसच्या १० आमदारांचा समावेश आहे. विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यावर यातले काही सदस्य सभागृहात दाखल झाले. विश्वासदर्शक ठरावानंतर शिवसेनेच्या ४० सदस्यांनी पक्षादेश पाळला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न मुख्य प्रतोद सुनिल प्रभु यांनी केला. यावर हे सगळं, सभागृहाच्या पटलावर असल्याचं सांगत, अध्यक्षांनी परवानगी नाकारली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असून त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानभवनाबाहेर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ६ महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना व्यक्त केली होती. आदित्य ठाकरे यांनी या शक्यतेला दुजोरा दिला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे नाकारता येणार नाही, असं ते म्हणाले. निवडणूक झालीच तर मोठ्या ताकदीनं पुन्हा निवडून येऊ, असं त्यांनी सांगितलं. तर, अजय चौधऱी यांचं गटनेते पद रद्द करणं किंवा प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची मान्यता रद्द करणं, हे दबावाखाली होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *