ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे मोर्चाचे करण्यात आले होते आयोजन
वर्धा, दि. १३: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी विदर्भातील हा पहिला एल्गार मोर्चा होता. माजी गृहमंत्री, आमदार अनिल देशमुख यांनी बैलबंडीवर बसून स्वार होऊन या एल्गार मोर्चाचे नेतृत्व केले.
ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी निघालेला हा एल्गार मोर्चा होता. शेकडो शेतकऱ्यांचा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एल्गार मोर्चात समावेश होता. हातात निरनिराळे फलक घेऊन घोषणाबाजी करत ढोल ताशाच्या गजरात हा एल्गार मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चाचा शेवट करत विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, तालुका अध्यक्ष महेश झोटींग, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, युवक कार्याध्यक्ष सचिन पारसडे, युवा नेते समीरभाऊ देशमुख, गजानन शेंडे, अशोक वांदिले, दिनकरराव घोरपडे, अशोकजी डगवार, बबनरावजी हिंगणीकर, प्राचार्य अशोक कलोडे, गणेश वैरागडे, रवींद्र झाडे, सोनू मेश्राम, संतोषरावजी तिमांडे, विनोदरावजी कुटे, गुरुदयालसिंग, दशरथ ठाकरे, सुरेशभाऊ भगत, राष्ट्रपाल कांबळे, संदीप झाडे, अनिल आडकीने, जावेद मिर्झा, सुभाष चौधरी, गोकुळ टिपले, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.