लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात, आज पहिल्या टप्प्यातील मतदान
लोकसभा निवडणूकतील पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. देशाच्या विविध राज्यातील ९१ मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, रामटेक, , भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशिम अशा एकूण सात मतदारसंघांत मतदान पार पडत आहे. महाराष्ट्र सोबत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये विधानसभेसाठी देखील मतदान होत आहे.
आसाम, बिहार, छत्तीसगड, मणिपूर, तेलंगणा याशिवाय मिझोराम, नागालँड व सिक्कीममधील एकमेव जागेसाठीही मतदान होणार आहे. ओडिशामध्ये पहिल्यांदाच चार टप्प्यांत मतदान होत आहे.
उत्तर प्रदेश पहिल्या टप्प्यात आठ मतदारसंघांत तर बंगालमध्ये एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे.