काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. परंतु, भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ स्वतः कडे सामावून घेतला. काँग्रेसच्या नेते मंडळींनी पुन्हा एकदा तो काबीज करण्यासाठी जोर लावला आहे. जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाची बैठक नुकतीच पार पाडली. सांगली येथे झालेल्या बैठकीमध्ये माजी मंत्री प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील, तसेच जिल्ह्यातील आमदार विशवजित कदम, आमदार मोहनराव कदम,नामदेवराव मोहिते, जयश्री पाटील, विशाल पाटील यांच्या नावाची शिफारस केली गेली आहे. यांपैकी नामदेवराव मोहिते, जयश्री पाटील, विशाल पाटील, मोहनराव कदम, विशवजित कदम यांनी लोकसभेला नकार दिला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील आणि प्रतीक पाटील यांच्यात अटीतटीची चुरस निर्माण झाली आहे.
पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतील चर्चेनंतर सांगलीतील उमेदवारी कोणाला मिळावी याबाबत अहवाल दिल्लीकडे पाठवला आहे. त्यामुळे आता दिल्लीहूनच सांगलीच्या उमेदवारीचा फैसला होणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेससाठी सांगलीची जागा महत्वपूर्ण ठरणार आहे. सांगलीच्या जागेबद्दल पार्लमेंटरी बोर्डाला देखील आशा वाटू लागली आहे. दिल्लीतील निर्णयाकडे काँग्रेससह भाजपचे हि लक्ष लागून आहे.