मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्रातील अनेक सैनिकांनी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची
आहुती दिली आहे. २८ जून २०१८ रोजीमहाराष्ट्र सरकारने अशा शाहिदाच्या परिवाराच्या
मदतीसाठी ५ एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शहीदांच्या परिवाराला मोफत
जमीन देण्याचा पहिला मान महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे.
२९ नोव्हेंबर २०१६ साली काश्मीरमधील नागरोटा इथे मातृभूमीचे रक्षण करताना संभाजी कदम
हे शहीद झाले. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती शहीद झाल्याने कदम कुटुंबावर दुःखचा डोंगर
कोसळला होता. नांदेड जिल्हा प्रशासनाने तात्काळ या कुटूंबाची दाखल घेतली. खरबी
या गावात शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला ५ एकर जमीन मोफत दिली.
वीरपत्नीला गावातील शासकीय जमीन मिळाल्याने आम्हाला आमच्या गावाचा अभिमान वाटतोय
असे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले.