वाचा आरोग्य मंत्र : तूप पचायला हलके पण…
आयुर्वेद कुतूहल – फोडणी ( मूर्च्छना)
फोडणी भारतीय आहारशास्त्राचा आधारभूत स्तंभ, ह्या फोडणी मुळेच आहाराला विविध प्रकारची चव येते आणि ती आपल्याला जाणवते तसेच ह्यामुळे आहार पचण्यास हलका होतो. पण सध्या फोडणीतील महत्वाचे अंगच कमी होत चालले आहे आणि ते म्हणजे तेल किंवा तूप ज्यावर हि फोडणी दिली जाते. सध्या वाढत चाललेल्या रोगराई मधील महत्वाचा आजार म्हणजे High Cholesterol आणि ह्याचमुळे तेल, तुपाच्या वापरावर डॉक्टर बंधन घालतात.
आयुर्वेदानुसार पाहायला गेले तर Cholesterol हा स्नेह द्रव्याचा अपचित भाग जो शरीरात आम (पचन न झालेल्या) अवस्थेत पडून राहतो व जेथे जेथे जागा मिळेल तिथे साठण्यास सुरुवात करतो विशेतः रक्त वाहिन्यांमध्ये आणि मग आजार उदभवतात. माणसाच्या शरीरात पेशी ह्या सर्वाधिक lipophilic म्हणजे स्नेह द्रव्य माध्यम शोषून घेतात मग असे असताना हि हे आजार होतात कारण आजकालची जीवनशैली.
आयुर्वेदात तेलास, तुपास अत्यंत महत्वाच स्थान आहे, तेल वात कमी करण्यासाठी तर तुप हे बुद्धी, दृष्टी, मज्जा तंतू ह्यांसाठी हितकर आहे, मग ह्यांचे सेवन करू नये का? करावे अवश्य करावे परंतु आयुर्वेदाचे नियम पाळून.
भाजी, डाळी ह्यांना फोडण्या देताना तेल, तूप ह्यांचा आवश्यक तेवढा वापर करावा. जेव्हा तेल तुपावर फोडणी पडते तेव्हा तो त्यावर झालेला संस्कार असतो ज्याला आयुर्वेदात मूर्च्छना असे म्हणतात. मूर्च्छनेत साधारण तिखट, तुरट, कडवट रसांची द्रव्य आयुर्वेदात वापरतात त्यामुळे त्यातील आम व गंध दोषांचा नाश होतो तेल तूप पचायला हलके होते आधुनिक शोधनानुसार ह्या मूर्च्छन (फोडणी) क्रियेमुळे free फॅटी acid saturation बदलते आणि त्याचे पचन नीट पार पडते. घरातील फोडणीत पडणारे हिंग,मोहरी,जिरे,लसूण,मिरची हे असेच कार्य करतात म्हणूनच तेल आणि तूप पचतेही नीट आणि त्या फोडणीमुळे भाजी देखील नीट पचते.
आता प्रश्न उरला तो तुपाचा जेव्हा आपण ते साधेच जेवणावर घेतो हे तूप तर फोडणी दिलेले नसते म्हणजे ह्याचा त्रास होऊ शकतो का? ज्यांची पाचन शक्ती चांगली नाही त्यांना क्वचित होण्याची शक्यता आहे, आणि त्याचे कारण असे की पूर्वी ज्या प्रमाणे तूप बनवले जयचे तसे आता बनत नाही. पूर्वी दुधाची साई काढणे, तिचे दही लावणे, मग लोणी काढणे आणि नंतर तूप कढवणे ह्या क्रिया होत आणि ह्या क्रियांमध्ये अनेक भौतिक, रासायनिक बदल होत, तसेच तूप काढवताना त्यात हळद किंवा विड्याची पाने चुरून घातली जायची ती एक प्रकारची मूर्च्छना असे ह्यामुळे तुपाचा रंग आणि गंध बदलत असे आणि ते तूप पचायला हलके असे.
परंतु आजकाल बाजारात मिळणारे तूप हे अधिकतर direct fat extraction म्हणजे दुधातून स्नेह द्रव्य शोषून बनवतात परिणामी ते पचायला सामान्य तुपापेक्षा जड असते आणि म्हणूनच नंतर त्रास होतो, ते तूप जर पुन्हा हळद किव्वा विड्याची पाने चुरून पुन्हा नीट कढवले तर त्या मानाने ते तूप पचण्यास हलके असेल. आणि संभाव्य आरोग्याचे धोके टळतील
१) कुठलेही तेल, तूप हे पचायला जडच असते म्हणूनच त्यांचा अतिरेक वाईटच.
२) अति स्थूल, अंग मेहनत न करणारे व्यक्ती ह्यांनी देखील तेल तुपाचा वापर कमीच करावा कारण, स्नेह द्रव्य पचण्यास शाररीक उष्णतेची आवश्यकता असते जी व्यायाम व इतर शाररीक कमामुळे प्राप्त होते.
३) आधीच स्नेह द्रव्यांचे अपचन असल्यास अथवा cholesterol सारखे त्रास असल्यास प्रथम स्नेह द्रव्यांचे पाचन करावे वैद्याच्या सल्ल्याने नंतर मग तेल तूप आवश्यक मात्रेत सेवन करावे.
तेल ,तूप वाईट नाही फक्त त्यांचे सेवन नियमात होणे आवश्यक आहे.
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब the Ayurvedic world ,
Ayurvedic clinic and Panchkarma Center
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)