Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

या चोरांचं सरकार पुन्हा येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर

या चोरांचं सरकार पुन्हा येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर

नांदेड: येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी राज्यातील सर्व ४८ जागा लढवणार आहेत. त्याचनिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथे पहिल्यांदाच जाहीर सभा घेेेतली.

नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ, असं आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.

आताचं सरकार व्यापाऱ्यांना धमकी देऊन स्वतःचा प्रचार करायला लावत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.

या चोरांचं सरकार पुन्हा देशात येऊ देऊ नका,” असंही आंबेडकर म्हणाले. आंबडेकर यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. प्रकाश आंबेडकर स्वतः सोलापूर आणि अकोला या दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *