देशाच्या कल्याणाकरिता आम्हाला युती हवी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
युतीची काळजी तुम्ही करू नका. हिंदूत्व मानतात, ते आमच्यासोबत येतील. हिंदूत्व
नकोय, ते विरोधात जातील. भारतीय जनता पक्ष कोणासमोरही लाचार होणार नाही.
मोदीजींचे सरकार पुन्हा या देशात स्थापन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशा
शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.
जालनामध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या कार्यकमा प्रसंगी फडणवीस बोलत होते.
देशाच्या कल्याणाकरिता आम्हाला युती हवी आहे. ज्यांनी ह्या देशाला लूटलं अशा चोरांच्या
हाती सत्ता जाऊ नये, म्हणून आम्ही युतीसाठी प्रयत्न करीत आहोत. भारतीय जनता पक्ष
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष आहे. तसेच भाजप
ह्या पक्षातील लोक शून्यातून जग उभ करणारे आहेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी
यावेळी सांगितले.