Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘घरोघरी तिरंगा’ चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

‘घरोघरी तिरंगा’ चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

औरंगाबाद(संभाजीनगर), दि. ६ : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाबाबत जिल्हाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने चित्ररथाची निर्मिती केली आहे. चित्ररथाच्या माध्यमातून मतदार आधार प्रमाणिकरण कार्यक्रम आणि कोविड लसीकरण अमृत महोत्सवाची देखील जनजागृती करण्यात येणार आहे.

या चित्ररथाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल दि. ५ हिरवी झेंडी दाखवली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.

चित्ररथाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात जागृती निर्माण करावी. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत प्रत्येकाने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरावर राष्ट्रध्वज फडकवावा. हे करत असताना सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करावे. यासह मतदार ओळखपत्र आधार कार्डला संलग्न करा. १५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत १८ वर्षांवरील सर्वांना मोफत कोविड लसीकरणांतर्गत बुस्टर डोस देऊन  कोविड लसीकरण अमृत महोत्सव साजरा होत असल्याबाबत जागृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.

राष्ट्रध्वज नागरिकांसाठी पोस्ट कार्यालयातही उपलब्ध

भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रसाठी राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत मा. प्रधानमंत्री व संचारमंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ध्वजाशी आपले नाते नेहमीच अनौपचारिक आणि संस्थात्मक राहिले आहे. स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्षी  राष्ट्र म्हणून एकत्रितपणे ध्वज घरी आणणे हे केवळ तिरंग्याची वैयक्तिक संबंधाचे नव्हे तर राष्ट्र उभारणीसाठी आपल्या वचन बद्धतेचेही प्रतीक आहे. ही भावना जागृत करणे ही या उपक्रमामागील कल्पना आहे. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा उद्देश आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबविली जाणार आहे. देशातील २० कोटी घरामध्ये तिरंगा पोहचविणे हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन केंद्र सरकारने भारतातील पोस्ट ऑफिस मध्ये भारतीय राष्ट्रध्वज नागरिकांसाठी विकत घेण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नागरिकांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन प्रवर डाकपाल  सुरेश बनसोडे मुख्य डाकघर ,औरंगाबाद यांनी केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *