आता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे लाभार्ती ५ वर्षात घरं विकू शकतात; राज्य सरकारने दिली परवानगी
मुंबई, दि.५: झोपडीधारकांना पक्कं घर दिल्यानंतर, ती घरं त्यांना पाच वर्षात विकता येतील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना घर मिळाल्यानंतर ती विकण्यासाठी दहा वर्षे वाट पाहावी लागत होती. हा कालावधी कमी केला जाईल असं गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारनं गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. २००० ते २०११ या कालावधीत बांधलेल्या झोपड्यांनाही संरक्षण द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून, या निर्णयाअंतर्गत अशा झोपडपट्टीधारकांना अडीच लाख रुपयांमध्ये पक्कं घर दिलं जाणार आहे.