Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या सैन्याने कोंढाणा (सिंहगड) किल्ला सर केल्याच्या ऐतिहासिक घटनेचे भारतीय जवानांनी केले स्मरण

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या सैन्याने कोंढाणा (सिंहगड) किल्ला सर केल्याच्या ऐतिहासिक घटनेचे भारतीय जवानांनी केले स्मरण

पुणे, दि. १९: बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने मराठा दिनी म्हणजेच, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी एका सायकल मोहिमेला  हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या मोहिमेत सहभागी झालेले जवान ८०० किलोमीटर अंतर कापून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व प्रमुख किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी पुण्‍यातील सिंहगडावर पोहोचले. या सायकलिंग मोहिमेचे नेतृत्व मराठा एलआय रेजिमेंटल सेंटरचे मेजर संदीप कुमार यांच्यासह दोन अधिका-यांनी केले. यामध्‍ये १३ जवान आणि दोन माजी सैनिकांचा  सहभाग झाले होता. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

४ फेब्रुवारी २०२४ हा दिवस भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटद्वारे मराठा दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदाार  तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला याच दिवशी (४ फेब्रुवारी) ताब्यात घेतला होता. इतिहासामध्‍ये  कोंढाण्याची लढाई अनेक दृष्‍टीने अनोखी मानली जाते. या लढाईविषयी  युद्धाचे प्रमुख धडे सामरिक ते रणनीती स्तरावर अभ्‍यासले जातात आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचे तेज, प्रेरणा आणि शौर्य यावर प्रकाश टाकणारी ही लढाई मानली जाते.

कोंढणा किल्‍ला सर करण्‍याच्या घटनेप्रीत्यर्थ काढण्‍यात आलेल्या सायकल यात्रा १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंहगडावर पोहोचली. यावेळी सायकल यात्रेतील जवानांनी ध्वजवंदन केले आणि तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केली. ‘कोंढाण्यातील यशस्वी लढाईच्या स्मरण कार्यक्रमामध्‍ये तानाजी मालुसरे यांचे शौर्य, या लढाईतील योगदान, कर्तृत्व आणि बलिदान यांचे स्मरण केले. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे तसेच त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी अशा मोहिमा शक्तिशाली मार्ग आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमामध्‍ये सेवानिवृत्त नौदल अधिकारी श्रीकांत केसनूर, विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांची सिंहगडाची लढाई आणि तानाजी मालुसरे यांचा पराक्रम या विषयावर भाषणे झाली आणि लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू, (निवृत्त) यांनी मराठ्यांचा हा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाची सांगता पारंपरिक मराठा पद्धतीच्या भोजनाने झाली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *