ठणठणीत राज्यपालांना खासदार संजय राऊत म्हणाले “हे ईश्वराने दिलेले संकेत” तर सामंत यांनीही लगावला टोला
मुंबई: राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या सेवेत असलेल्या राजभवनावरील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यावर राज्यपाल कोश्यारी यांनीही स्वतःला सेल्फ क्वारंटाईन केल्याचं वृत्त होतं. पण काही वेळापूर्वी राज्यपालांनी स्पष्ट केलं की आपली टेस्ट झाली असुन प्रकृतीही उत्तम आहे.
या संदर्भात एक ट्विट करत त्यांनी माध्यमांना सांगितलं की, “आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत.”
आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 12, 2020
राजभवनावरील कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह आल्याचे वृत्त बाहेर आल्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले की, “परीक्षा घ्या, परीक्षा घ्या… हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आग्रह किती चुकीचा आहे, हे त्यांना नियतीनंच दाखवून दिलंय. देशात, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचं का?, असा संजय राऊत यांनी केलाय. ते म्हणाले की, हे ईश्वरानं दिलेले संकेत आहेत आणि राज्यपाल धर्म, संस्कृती, ईश्वर यांना मानणारे आहेत.”
यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत राज्यपालांना टोला लगावत म्हणाले की, “राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???”