Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“आता संभाजीनगर मध्ये रझाकारी सुरू झाली आहे” : चंद्रकांत खैरे

“आता संभाजीनगर मध्ये रझाकारी सुरू झाली आहे” : चंद्रकांत खैरे

मुंबई: काल लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. महाराष्ट्रापुरता विचार करायला गेलं तर इथेही काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचा धुवाच उडाला. पण महाराष्ट्रात काही निकाल धक्कादायक लागले. त्यातला एक म्हणजे खासदार चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबाद मतदारसंघातून झालेला पराभव. फरक फक्त ५००० हजार मतांचा राहिला पण हा पराभव त्यांच्या व शिवसेनेचे च्या मोठाच जिव्हारी लागला.

निकालानंतर दुसऱ्याच दिवशी आज दि. २४ रोजी चंद्रकांत खैरे यांनी थेट मातोश्री गाठली व उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी बाहेर आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “माझं दुर्दैव आहे की मी पराभूत झालो. माझ्या निकालाबाबत स्वतः उद्धव ठाकरेही जातीने लक्ष देऊन होते.”
इम्तियाज जलील यांच्या विजयाबाबत ते म्हणाले की आता संभाजीनगर येथे रझाकारी सुरू झाली आहे. काल त्यांच्याकडून गैरप्रकार करण्यात आले. हिरवा गुलाल उधळणे, मुलींची छेड, लोकांना त्रास देणे हे प्रकार झाले तसेच आमच्या गाड्याही काल फोडण्यात आल्या होत्या.”
उद्धव ठाकरे हे आपल्या पाठीशी असल्याचेही चंद्रकांत खैरे या वेळी म्हणाले. या पराभवाचे खापर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर फोडले जात आहे. दनवेंनी आपले जावई हर्षवर्धन जाधव यांना या निवडणुकीत मदत केल्याचा दावा केला जात आहे. आता शिवसेना याचा कशाप्रकारे वचपा घेते हे आगामी काळात स्पष्ट होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *