मध्यरात्री पासून सामन्य प्रवाशांसाठी रेल्वे बंदी; होणार कठोर अंमलबजावणी
मुंबई: अखेर आज प्रशासनाने सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे बंदीची घोषणा केली. उद्या मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा व शासकीय कर्मचारी सोडून सर्वांना रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी स्पष्ट केले की सामन्य प्रवाशांना रेल्वे स्थानकांच्या बाहेरच थांबवत प्रवेश नाकारण्यात येणार आहे. याच सोबत रुग्णांनाही प्रवासात सूट देण्यात आली आहे.
तसे पाहायला गेले तर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक इशारा दिला होता.