लॉकडाऊन वाढवल्यामुळे ३ मे पर्यंत सर्व विमान, लोकल, रेल्वेगाड्या रद्द
देशव्यापी टाळेबंदी 3 मे पर्यंत वाढ झाल्यामुळं भारतीय रेल्वेनं सर्व प्रवासीगाड्यांची वाहतूक ३ मे पर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे ३ मे पर्यंत सर्व एक्स्प्रेस, पॅसेंजर, लोकल, मेट्रो आणि इतर प्रवासी रेल्वेगाड्या बंद राहणार आहे. या कालावधीसाठी लोकांनी आरक्षित केलेल्या तिकिटांचा पूर्ण परतावा रेल्वेकडून दिला जाणार आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत रेल्वे तिकिटांचे आरक्षण सुरू न करण्याचे आदेशही रेल्वे बोर्डाने दिले आहेत. रेल्वेने होणारी माल वाहतूक मात्र या दरम्यान सुरू राहणार आहे.
या दरम्यान सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणंही रद्द केल्याची घोषणा विमान वाहतूक संचालनालयानं केली आहे.
Credit – AIR