नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन ने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा केला निषेध
नवी मुंबई, दि.२६: केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करणे, फेरीवाल्यांच्या समस्या, घरकुल इ.प्रश्नांसंदर्भात आज अॅड.सुरेश ठाकुर यांच्या नेत्रुत्वात सिबीडी येथील सिडको भवनवर मोर्चा काढण्यात आला.यावेळी बाळकृष्ण खोपडे, नरेंद्र वैराळ, यशवंत काळे, अशोक आठवले, सुरेश सुपे, रामेश्वर साळवे इ. कामगार उपस्थित होते.
२०१४ पासुनच केंद्रातील सत्ता बदलानंतर वाटले होते. काहीतरी चांगले होईल पण कसले काय आल्या आल्या छोटे छोटे ५४ कामगार कायदे बदलुन आपल्याला कामगारांशी काहीच घेणेदेणे नाही. आतातर हे सरकार एव्हढे मस्तवाल झाले आहे की यांना फक्त बड्या धेंड्याना पोसायचे आहे. अंबानी, रिलायन्स, अदानी, मल्या, निरव, इ.ची हजोरो कोटीची कर्जे माफ केली आणि त्याचा भार शेतकरी, कामगार, मजुर, फेरीवाले यांच्यावर टाकण्यात येत आहे. कारखानदार, मालकांच्या हातात सर्व अधिकार देऊन हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अगोदर २० कामगारांची मर्यादा होती आता ३०० कामगार असलेल्या कंपनी, कारखानदार, मालकांना सर्वाधिकार देण्यात येऊन कोणत्याही कामगाराला विनानोटीस कामावरुन कमी करता येईल, कंपनी बंद करता येईल, कंत्राटीच काय पण कायम कामगारांनाही कामावरुन कमी करण्याचा अधिकार मालकांना मिळणार आहे. आणि या साठी सरकारची परवानगी ची गरज राहणार नाही. खाजगी क्षेत्र असो की सरकारी किंवा संरक्षण विभाग कोणत्याही क्षेत्रात फक्त मालकांचीच हुकुमशाही चालणार आहे. अशा कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी अनेक कामगार संघटना भारतबंद करण्यासाठी रस्यावर ऊतरल्या आहेत.वेळीच आपण सर्व कामगारांनी एकत्रित पणे लढा देऊन हे सरकार पाडलेच पाहीजे. नाहीतर आपले भविष्य खरोखरच अंधकारमय होईल. आत्महत्या कराव्या लागतील, भिका मागाव्या लागतील, चोऱ्या-माऱ्या करुन कुटुंबे सांभाळावी लागतील. बघा करा विचार अजुनही वेळ गेलीली नाही. ही सुवर्णसंधी सोडु नका. आपापसातील हेवेदावे सोडुन द्या आणि वज्रमुठ करुन एकत्रित लढा द्यावा..
– नरेंद्र वैराळ
नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन