“या” कारणामुळे किरीट सोमैय्यांना मागील लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिलं नाही – नवाब मलिक यांचा सोमैय्यांना टोला
उद्योगपती कपिल वाधवान प्रकरणाच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करुन या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
नवाब मलिक म्हणाले की, “वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देणारे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून ज्याप्रकारची वक्तव्यं करत आहेत, केली जात आहेत, तशाप्रकारच्या वक्तव्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्याच पक्षाने मागील लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट दिले नव्हते. तसेच आयइएस, आयपीएस अधिकारी हे थेट पीएमओ कार्यालयाच्या आधीन असतात. याबाबत, केंद्र सरकारला कारवाई करायची असल्यास त्यांनी करावी. मात्र, किरीट सोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले.