चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या राज्यांना सूचना
मुंबई/नवी दिल्ली, दि. २६: २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाच्या वेळी; विद्यार्थ्याचं वय ६ वर्षे असल्याची खात्री करण्याची विनंती शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदींनुसार हे गरजेचं आहे. २०२४-२५ वर्षासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यानुसार प्रवेश दिले जात असल्याची काळजी घेणं अपेक्षित असल्याचं शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने १५ जानेवारीच्या आपल्या पत्रात म्हटले आहे.