Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे उरण येथील कळंबुसरे गावातील जितेश ठाकूर या निष्पाप तरुणाचा गमवावे लागले प्राण

बेकायदेशीर व अनिधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी

उरण, दि.१८(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील चिरनेर- कोप्रोली मार्गावरील कळंबुसरे गावाजवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर अनेकांनी अनधिकृत बांधकामे करून अतिक्रमण चालू केले आहे. त्यामुळे अपघाताचा आणि वाहतुक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना, प्रवाशांना, वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. कळंबुसरे गावाजवळील मिर्ची गोदामाजावळ तर बाजूला रस्त्यावर ८ ते १० फुट अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. आता तर या बांधकामाच्या बाजूला दगडाचा बांध तयार केला आहे. या अतिक्रमणामुळेच मंगळवार दिनांक १७ मे २०२२ रोजी उरण तालुक्यातील खोपटे बांधपाडा गावातील जितेश जगन्नाथ ठाकूर या २४ वय वर्ष असलेल्या युवकाचा निष्पाप बळी गेला आहे. सदर युवक कामावरून घरी जात असताना येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना दगडांना धडक लागून गोदामाच्या भिंतीला डोके आपटून युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही अतिक्रमणे हटविण्यात यावी अशी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याने या अतिक्रमणांना बांधकाम विभागाचे अभय असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. कळंबूसरे बस स्टॉप व मिर्ची गोदामा जवळील व मुख्य रस्त्यावरील अनिधिकृत, बेकायदेशीर बांधकाम हटविण्यात यावेत. शिवाय रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहने उभी असतात. त्यामुळे अपघात होतात तेव्हा अशी दोन्ही बाजूंना वाहने रस्त्यावर उभी करू नयेत अशी मागणी खोपटे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *