Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जालन्यातून शेवटी दानवेंची उमेदवारी निश्चित 

जालन्यातून शेवटी दानवेंची उमेदवारी निश्चित 

जालना लोकसभा मतदारसंघाचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे ईशान्य मुंबईतही भाजप लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

जालन्यामध्ये दानवेंना उमेदवारी मिळाली असून अर्जुन खोतकर यांची आता वैयक्तिक भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

त्यातच ईशान्य मुंबईतही भाजपकडून किरीट सोमय्या यांचे नाव पुढे येत आहे पण किरीट सोमय्यांविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे भाजपचा ईशान्य मुंबईचा उमेदवार कोण असणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *