प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास केंद्रस्थानी असणार
नवी दिल्ली/मुंबई, दि. २३: सणासुदीच्या विशेष काळात देशभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. छठ सणापूर्वी प्रवासात वाढ होत असताना, प्रत्येक प्रवासी सुरक्षित आणि आरामात त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचावा यासाठी रेल्वे अतिरिक्त प्रयत्न करत आहे. नियमित रेल्वे सेवांव्यतिरिक्त, पुढील पाच दिवसांत दररोज सरासरी ३०० विशेष गाड्यांसह १५०० विशेष गाड्या चालवल्या जातील. कार्यक्षम व्यवस्था, सुधारित प्रवासी सेवा आणि सुविधा आणि प्रवाश्यांची योग्य काळजी घेण्याच्या वचनबद्धतेसह, भारतीय रेल्वे उत्सवाच्या काळात प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान चांगली सेवा मिळेल याची खात्री करत आहे.
नियमित गाड्यांव्यतिरिक्त, गेल्या २१ दिवसांमध्ये ४,४९३ विशेष गाड्या, म्हणजेच दररोज सरासरी २१३ फेऱ्या वाढविल्याने, प्रवाशांना दिवाळीच्या उत्सवासाठी सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचण्यास मदत झाली. या वर्षी येणाऱ्या छठ पूजा आणि दिवाळी हंगामासाठी, भारतीय रेल्वे प्रवाश्यांची गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी एक मजबूत आणि विशेष रेल्वे वेळापत्रक चालवत आहे. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या ६१ दिवसांच्या कालावधीत, देशभरात १२,००० हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
| Date | Trips |
| 21-10-2025 | 282 |
| 22-10-2025 | 285 |
| 23-10-2025 | 295 |
| 24-10-2025 | 303 |
| 25-10-2025 | 311 |
| 26-10-2025 | 305 |
| 27-10-2025 | 286 |
| 28-10-2025 | 242 |
| 29-10-2025 | 242 |
| 30-10-2025 | 263 |
| 31-10-2025 | 263 |
आतापर्यंत, एकूण ११,८६५ फेऱ्या (९१६ गाड्या) अधिसूचित करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ९,३३८ आरक्षित आणि २,२०३ अनारक्षित फेऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ७,७२४ पूजा आणि दिवाळी विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या त्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे, जे सणासुदीच्या काळात सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेची निरंतर वचनबद्धता दर्शवते.
