Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर १९ जूनला पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर १९ जूनला पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्ली: सोमवारी मध्यरात्री लडाख येथील पर्वतरांगांमध्ये गॅलवान भागात भारत व चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. यावेळी भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले... Read more »

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार – गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ आपत्ती सेवा पदकाने गौरविले जाणार – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात सर्वत्र अगदी ग्रामपातळीपर्यंत पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

उद्योजकांनी भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

उद्योजकांनी भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे जिल्ह्यातील उद्योग बंद करण्यात आले होते. त्यामुळे परप्रांतीय मजुर आपापल्या... Read more »

महाराष्ट्रावर गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत – मुख्यमंत्री मुंबई: एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करुत. हे आणि... Read more »

महत्वाची वार्ता: कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार

कोरोनामुळे शिक्षण थांबू नये मुख्यमंत्र्यांनी केला शालेय शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मुंबई दि १५: कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होईल मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण,... Read more »

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ११ हजाराहूनअधिक प्रवासी मुंबईत दाखल

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ११ हजाराहूनअधिक प्रवासी मुंबईत दाखल मुंबई, दि. १४: ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ७२ विमानांमधून तब्बल ११ हजार ६६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ४३१३... Read more »

साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे – कृषिमंत्री दादाजी भुसे

साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे – कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई: कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. सुमारे ६ लाख ६३ हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात ५६ हजार २१६ शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याच्या काळात राज्यात खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी कृषिमंत्री, सचिव, आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरिता कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कालपर्यंत राज्यभरात पुरविण्यात आलेल्या कृषि निविष्ठांची माहिती अशी: ·       ठाणे विभागात ६६६२ गटांच्या माध्यमातून ८६ हजार ७४८ शेतकऱ्यांना ४९९६ मेट्रीक टन खते आणि १० हजार २३० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. ·       कोल्हापूर विभागात २७६६ गटांनी ४५ हजार १११ शेतकऱ्यांना १४ हजार ७४० मेट्रीक टन खत आणि ४९५७ क्विंटल बियाणे पुरविलं आहे. ·       नाशिक विभागात ८०३५ गटांच्या माध्यमातून १ लाख ४६ हजार २५२ शेतकऱ्यांना ३६ हजार ५७५ मेट्रीक टन खत व १४ हजार ५११ क्विंटल बियाणे पुरविलं आहे. ·       पुणे विभागात १८ हजार १८१ गटांनी १ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांना १९ हजार १८१ मेट्रीक टन खत तर ६९१४ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       औरंगाबाद विभागात ३७१६ गटांनी ६३ हजार ९६३ शेतकऱ्यांना ४२ हजार ५५९ मेट्रीक टन खत आणि ७४१९ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       लातूर विभागात ७९४९ गटांनी ८४ हजार ७७६ शेतकऱ्यांना ३८ हजार ५०१ मेट्रीक टन खते, १५ हजार २२८ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       अमरावती  विभागात ६२२१ गटांनी ८९ हजार शेतकऱ्यांना ३१ हजार ४७४ मेट्रीक टन खत तर ४५ हजार ५८५ क्विंटल बियाणे पुरविले आहे. ·       नागपूर विभागात २६८६ गटांनी ३० हजार ६६९ शेतकऱ्यांना ८४३१ मेट्रीक टन खते आणि १२ हजार ५९२ क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. राज्यात अमरावती विभागात सर्वाधिक ४३ हजार ६५५ कापूस बियाणे पाकीटांचा पुरवठा झाला आहे. विभागामार्फत बांधावर खते, बियाणे पुरवठा करण्याची मोहिम सुरू असून जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले. Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा रद्द मुंबई/अलिबाग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उद्याचा रायगड-२ दौरा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे. याबाबत अधिकृतरित्या थोड्याच वेळापूर्वी माध्यमांना कळवण्यात आले आहे. या दौऱ्यावेळी... Read more »

मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्‍ग्रस्तांना मदतीचे वाटप

मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; आपद्‍ग्रस्तांना मदतीचे वाटप मुंबई/अलिबाग/मुरुड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, रविवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चौल, बोर्ली, मुरुड येथे भेट देणार आहेत. निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत... Read more »

दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही अफवांवर विश्वास ठेऊ नये

दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केलेली नाही अफवांवर विश्वास ठेऊ नये मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात... Read more »