जळगाव जिल्ह्यास आणखी रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील – गुलाबराव पाटील
जळगाव: कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वाची असून जिल्ह्यास आणखी रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल सांगितलं.
जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसऱ्या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज झाला आहे असं पाटील म्हणाले. जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणातंर्गत प्राप्त झालेल्या १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणप्रसंगी ते काल बोलत होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिका चालकांना किल्ल्या देऊन या रूग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्या. या चालकांना किलोमीटरऐवजी फेरीनुसार वेतन देण्याची मागणी मान्य करून त्यांना पाटील यांनी यावेळी दिलासा दिला.
Source – AIR