संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, जयदीप कवाडे यांची स्मृती इराणींवर टीका
नागपूर: निवडणूक म्हटलं की टीका, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. त्यातच आज पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली.
नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारसभेत जयदीप बोलत होते.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल टीका करताना जयदीप कवाडे यांनी संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं साधं सोपं नाही असे म्हटले आहे. जयदीय यांनी स्मृती इराणी यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर नाना पटोले यांनी जयदीपला शाबासकीही दिली.
जयदीप यांच्या या आक्षेपार्ह भाषणानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.