आकाशवाणीच्या विशेष समारंभात होणार सत्कार नवी दिल्ली: रत्नागिरीच्या चैतन्य परब या बाल कलाकाराने आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन (ख्याल गायन) स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. १७ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आकाशवाणीच्या विशेष समारंभात चैतन्यला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या वतीने दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे देश पातळीवर आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात झालेली प्राथमिक फेरी यशस्वी पार पडून चैतन्यची दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या अंतिम फेरीसाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी केंद्रातून स्पर्धक दाखल झाले होते. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकित शर्मा याची प्रथम तर रत्नागिरीच्या चैतन्य परब ची द्वितीय क्रमांकासाठी निवड केली. चैतन्य हा रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. चैतन्यने संगीताचे सुरूवातीचे शिक्षण त्याची आई विनया परब यांच्याकडे घेतले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच त्याने मंडळाची हार्मोनियममधील मध्यमा प्रथम ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. चैतन्य सध्या गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे.
महाराष्ट्र वार्ता
पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली मुंबई, दि. ७ : महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या...
“माझ्या कुटुंबाला एकही पैसा नकोय, न्याय हवाय न्याय !”; उन्नाव कांडातील पीडितेच्या वडिलांचा आक्रोश उत्तर प्रदेश: उन्नाव...
केरळ विधान मंडळाच्या पर्यावरण समितीने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट मुंबई : केरळ विधान मंडळाच्या पर्यावरण समितीने विधानसभा...
कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु मुंबई, दि. ६, राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत पुणे: विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असं असेल डॉ. बाबासाहेबांचं इंदू मिलमधील स्मारक !
78 हजार 64 बालके आणि 11 हजार 977 गर्भवती महिलांना लसीकरणाचे नियोजन मुंबई, दि. ५ : राज्यात मिशन इंद्रधनुष विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला असून 25 जिल्हे...
मुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त मुंबई, दि. ५ : राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली...
इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. ५...
