एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी आजपासून देशभरात लागू
एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या आयात साठवणूक आणि विक्रीवरील बंदी देशभरात आजपासून लागू होत आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्रालयाने काल राज्य सरकारांचे अधिकारी आणि ८२ शहरांमधल्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. याबाबतची अधिसूचना गेल्यावर्षी १२ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली होती. ही बंदी आजपासून लागू झाली आहे.
यानुसार एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंचं उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापर करता येणार नाही. यात प्लास्टिकची ताटं, कप, फुगे, झेंडे, सजावटीसाठी पॉलिस्टिरीन अर्थात थर्मकॉल आणि इतर वस्तूंचा यात समावेश आहे. या नियमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नियंत्रण कक्षांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं दिली आहे.
Source – AIR