कोरोना बाधितांची संख्या गेली ९७ वर; मुंबई अव्वल स्थानी
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळ पर्यंत आलेल्या कोरोना ग्रस्तांचे तपशील मांडले. राज्यात आज सायंकाळनंतर कोरोनाचे ८ नवीन रुग्ण आढळून आले असून राज्यातील एकूण रुग्ण संख्या ९७ झाली आहे. आठ नवीन रुग्णांमध्ये मुंबई, कल्याण, ठाणे येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मुंबईतील रुग्णाचा अबुधाबी येथील तर कल्याणच्या रुग्णाचा पेरू देशातील प्रवासाचा इतिहास आहे.
ठाणे येथील रुग्ण हा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातुन बाधित झाला आहे.सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील एक असून तिचा दुबई प्रवासाचा इतिहास आहे.सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधील एकाच कुटुंबातील चौघांना लागण झाली आहे.या चौघांचाही सौदी अरेबिया प्रवासाचा इतिहास आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंध राज्यात संचारबंदी लागू केली. याच सोबत जिल्ह्या-जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.