राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि माध्यमांचं योगदान खूप महत्वाचं राहील – मुखमंत्री उद्धव ठाकरे
राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि माध्यमांचं योगदान खूप महत्वाचं राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
सामाजिक आणि राष्ट्रीय विकासात लोकहिताची भूमिका घेऊन प्रसंगी सरकारला जबाबदारीची जाणीव करून देण्यात माध्यमं पुढाकार घेतात. म्हणूनच पत्रकारांनी अधिक विश्वासार्हता जपत राज्यातील गोरगरीब सामान्य जनतेच्या भल्यासाठी भरीव योगदान द्यावं असं त्यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांना सध्या विविध आघाड्यांवर लढावं लागत असून त्यांच्या विविध प्रश्नांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे