पाटणा येथील सर्वपक्षीय बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मांडले आपले मत
पाटणा, दि. २३: पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरेही उपस्थित होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारपर्यंत सर्व लोक इथे जमले आहेत. आपली विचारधारा वेगळी असू शकते पण देश एक आहे, असे ते म्हणाले. हा देश वाचवण्यासाठी आणि त्याची अखंडता टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीवर हल्ला करणाऱ्याला आम्ही विरोध करू, असे ठाकरे म्हणाले. देशात कोणतीही हुकूमशाही आणायची असेल, आम्ही त्याच्या विरोधात उभे राहू.
सुरुवात चांगली झाली की भविष्य चांगलेच होईल याची मला खात्री आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान आपण भेटत राहू असे ते म्हणाले. ममता बॅनर्जींच्या वक्तव्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आम्ही विरोधक नाही, तर देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत.
विरोधी पक्षांची पुढील बैठक शिमल्यात होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही १० किंवा १२ जुलै रोजी शिमल्यात पुन्हा बैठक घेत आहोत ज्यामध्ये आम्ही एक समान अजेंडा तयार करू. आम्हाला प्रत्येक राज्यात वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल.
