Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणामुळे सहकारी बँका बंद होतील – खा. शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप

पुणे, दि.७: भारतीय रिझर्व बँकेचं(RBI) सहकारी बँकांसंदर्भातलं नवीन धोरण म्हणजे सहकारी बँकांचं विलनीकरण करण्याचा घाट आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. या ते आज पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. नवीन धोरणामुळे सहकारी बँका बंद होतील, याचा सामान्य नागरिकांनी फटका बसेल.

या नवीन धोरणा विरोधात सर्व सहकारी बँकांनी एकत्र येऊन न्यायालयात आव्हान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. सहकारी बँकांनी महाराष्ट्रच्या विकासात महत्त्वाची भूमीका बजावली आहे, असंही ते म्हणाले. केंद्र सरकार  ईडी, अर्थात सक्तवसूली संचालनालयाचा गैरवापर करत असून, ईडी ची अशा प्रकारची कारवाई आपण आजपर्यंत पाहिली नाही, अशी टिकाही त्यांनी केली.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *