महिलांविरोधातले अत्याचार रोखण्यासाठी राज्यात दिशा कायदा पारित करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन
नंदुरबार: महिलांविरोधातले अत्याचार रोखण्यासाठी येत्या अधिवेशनात राज्यात तामिळनाडूच्या धर्तीवर दिशा कायदा पारित करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं विष्णू नारायण मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
रावेर प्रमाणे सारंगखेडा इथं झालेल्या मुलीच्या हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातलं महाआघाडीचं सरकार मजबूत असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.