महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 965G च्या बारामती-इंदापूर क्षेत्रातल्या तुकाराम महाराज पालखी मार्गावर यशस्वी वृक्षारोपण केलेल्या १,०२५ वटवृक्षांपैकी ८५% वृक्ष जीवित आहेत – नितीन गडकरी
पुणे, दि. २: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट मालिकेच्या माध्यमातून सांगितलं आहे की महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 965G च्या बारामती इंदापूर क्षेत्रात मोडणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आपण फेब्रुवारी आणि मार्च २०२२ मध्ये वृक्षारोपण प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पा अंतर्गत आपण १०२५ वटवृक्ष या महामार्गाच्या कडेने लावले होते. या रोपण केलेल्या वृक्षांपैकी ८७० वृक्ष (८५%) सुरक्षित आणि जीवित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रोपण केलेले हे वृक्ष अतिशय जोमाने वाढले असून दररोज विशाल पर्णसंभाराचं दर्शन घडत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाचं संवर्धनच झालं नाही तर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे वृक्ष नेत्रसुखद अनुभवही देत आहेत.
