पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
पुणे, दि. १: विरोधी गटातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंचावर एकत्र बसणार का? शरद पवार हे पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? असे अनेक प्रश्न गेले महिनाभर राजकीय पटलावर चर्चिले जात होते. यादरम्यान राष्ट्रवादी च्या मित्रपक्षांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत विनंती केली होती. अखेर या सार्या चर्चांना छेद देत शरद पवार यांनी आज लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एका बाजूला केंद्रात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये तीव्र पडसाद उमटत असताना, पुण्यातील एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी मंचावर एकमेकांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांच्याजवळ जात त्यांची विचारपूस केली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचे बंडखोर पुतणे अजित पवार उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधान मोदींनीही अजित पवारांच्या पाठीवर थाप देत त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, पवार म्हणाले, “लोकमान्य टिळकांना देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते आणि त्यांनी त्यांचे सुरुवातीचे दिवस पुण्यात व्यतीत केले. इंग्रजांपासून स्वतंत्र होण्यासाठी, टिळकांना माहित होते की त्यांना जनतेला एकत्र करणे आवश्यक आहे. ते पत्रकार झाले आणि नंतर केसरी झाले. आणि मराठा साप्ताहिक वृत्तपत्रे काढली आणि इंग्रजांविरुद्ध लढा दिला. टिळक म्हणत असत की पत्रकारितेवर दबाव आणू नये आणि पत्रकारांवर दबाव आणू नये.”
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, “पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे, हे आपले सौभाग्य आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याची दिशाच बदलली. देशाची संस्कृती आणि परंपरा महान असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. देश स्वतंत्र होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये त्यांनी पहिल्यांदा निर्माण केला. देशासमोर सहकार्याचे मोठे उदाहरण ठेवले. स्वातंत्र्य लढ्यातील वर्तमानपत्राचे महत्त्व ओळखून त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतानाच समाजातील वाईट प्रथांविरोधातही त्यांनी लढा दिला.
गीतारहस्याच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोग सोप्या पद्धतीने सांगितला. त्यांचा लोकांवर विश्वास होता. असाच लोकांच्या कर्तृत्वावर, प्रामाणिकपणावर आमचाही विश्वास आहे. देशात विश्वासाने भरलेले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळेच देश विकासाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांमधील देश निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
लोकमान्य टिळकांना समृद्ध, बलाढ्य, कर्तृत्ववान देशाची निर्मिती अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी देशामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी त्याकाळी स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला. त्यापैकी महत्त्वाचे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्लंडला जाऊन बॅरीस्टर होता यावे, यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याची शिफारसही टिळकांनी केली होती.

न्यू इंग्लिश स्कूल, डेक्क्न एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या संस्थांची स्थापना ही त्यांची दूरदृष्टी दर्शवून देते. या संस्थांतून असे कित्येक युवा निघाले ज्यांनी टिळकांचे मिशन पुढे चालवले. राष्ट्रनिर्माणामध्ये आपली भूमिका बजावली. व्यवस्था निर्मितीकडून संस्थांची निर्मिती, संस्था निर्मितीतून व्यक्तीनिर्मिती आणि व्यक्तीनिर्मितीतून राष्ट्रनिर्मिती हे व्हिजन राष्ट्राच्या भविष्यासाठी पथदर्शी असते. त्यावर आज देश प्रभावीपणे वाटचाल करत आहे. देशातील लोकांच्या विश्वासाने आणि प्रयत्नांमुळेच देश आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला देत असल्याची घोषणा प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी केली.
तत्पूर्वी,
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार शेवटचे सात वर्षांपूर्वी एकत्र मंचावर दिसले होते. त्यांचे महाराष्ट्रातील मित्रपक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना आजचा कार्यक्रम वगळण्याची विनंती केली, श्री पवार म्हणाले की, त्यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले होते, कारण ते भिक घालू शकत नाहीत.
मित्रपक्षांनी पवारांनी निवड रद्द करावी असे म्हटले होते, विशेषत: त्यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर आणि त्यांच्या पुतण्याच्या विश्वासघातानंतर, पंतप्रधान मोदींच्या भाजपने सक्षम केले.
