“देशव्यापी लॉकडाऊन संपत असला तरी खबरदारी घेण्याची गरज” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतीयांच्या या वृत्तीप्रमाणेच आयुर्वेद आणि योगसाधनेबद्दल साऱ्या जगात आदर आणि उत्सुकता निर्माण झाली आहे असं त्यांनी सांगितलं. आयुष मंत्रालयातर्फे येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय योग – ब्लॉग स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
या श्रमिकांना घरी पोचता यावं यासाठी काम करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या रेल्वे, अणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं कामही कोरोना योद्ध्यांइतकंच महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.
कोविड-१९ ची महामारी आणि लॉकडाऊनच्या काळातले धडे देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर पुढं जायला उपयुक्त ठरतील असं सांगून त्यांनी अनेक प्रेरणादायी उदाहरणांचा उल्लेख केला.
सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने केलेल्या काही उपाययोजनांची माहिती मोदी यांनी दिली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त रुग्णांवर मोफत औषधोपचार झाले आहेत.
ज्याची किंमत १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या योजनेच्या ५०%हून जास्त लाभार्थी महिला आहेत. ८०% हून जास्त लाभार्थी ग्रामीण भागातले आहेत.
एकीकडे कोविड-१९ महामारीचा सामना करत असताना अंफन वादळाशी झुंजणाऱ्या पश्चिम बंगाल आणि ओदिशाचं तसंच टोळधाडीचा सामना करणाऱ्या राज्यांचं मोदी यांनी कौतुक केलं.
सद्भावना आणि सामंजस्याने जगण्याची प्रेरणा आपण निसर्गापासून घेतली पाहिजे असं ते म्हणाले.पर्यावरण दिनी प्रत्येकाने एक झाड लावावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.
