“कोरोनाची साथ माणुसकीचा नाश करत आहे” – डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काल सांगितले की, कोरोनाची साथ माणुसकीचा नाश करत आहे आणि आपण सर्वांनी आपल्यातील सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे याच्याशी लढायला हवे. ते म्हणाले, आम्ही दृढनिश्चय, चिकाटी आणि सतत प्रयत्न करून या परिस्थितीवर नक्कीच विजय मिळवू.
डॉ. भागवत हे कोविड रेस्पॉन्स टीम, दिल्लीतर्फे आयोजित ‘हम जितेंगे – पॉझिटिव्हिटी असीमित’ या व्याख्यानमालेच्या अंतर्गत बोलत होते. निरोगी आहार, योग आणि व्यायामाचा अवलंब करून लोकांनी स्वस्थ राहावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. भागवत यांनी वैज्ञानिक माध्यमांनी लोकांना सोशल मीडियावरील माहितीची पडताळणी करण्याचे आवाहनही केले. या आव्हानात्मक काळात जनजागृती आणि सार्वजनिक प्रशिक्षण यांचे महत्त्व खूप आहे यावर त्यांनी भर दिला.
आपला देश यापूर्वी बऱ्याच संकटाला यशस्वीरित्या सामोरे गेला आहे आणि आपण घाबरू नये, निराश होऊ नये आणि सतर्क व सक्रिय राहायला हवे,असंही ते म्हणाले.
