संरक्षण राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली, दि.२०: जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कार्यान्वयन नियंत्रणाखाली असणाऱ्या नियंत्रणरेषेवर ३० नोव्हेंबर २०१९ ते २९ नोव्हेंबर २०२१ या काळात एकूण ५,६०१ वेळा युद्धबंदी/शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन झाल्याची नोंद झाली. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य फॉरवर्ड चौक्यांवर तैनात सैन्यबळाला असते. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवायांमध्ये पाकिस्तानी चौक्या आणि जवानांचे लक्षणीय नुकसान झाले आहे.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत डॉ. अनिल अग्रवाल यांना लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.
